जैविक शेती

*जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय, विषमुक्त, शेती करण्याचे फायदे*
*व*
*रासायनिक का नको ...?*

*ह्याबद्दलची 50 कारणे*
 
*हा माझा अनुभव आहे जैविक शेती काळाची गरज आहे*
*१)* जमिनिचा नैसर्गिकरित्या पोत सुधारतो, उत्पन्न वाढते, खर्च कमी होतो. विषमुक्त अन्न मिळते,ज्यामूळे धोके टळतात,आजारपण कमी येते. मालाला भाव चांगला भेटतो.

*२ )* पाण्याची ५० % बचत होते .

३ )* सर्वच प्रकारच्या जीवजंतुंची जमिनीत झपाटयाने वाढ होते .

*४ )* जमिनीची सुपीकता वाढते .

*५ )* जमिनीचा पोत वाढतो .

*६ )* हवेतील ओलावा ओढून घेते .

*७ )* नत्र उपलब्ध होते .

*८ )* प्रथिनांचे प्रमाणानुसार कुजण्याचा 'वेग वाढतो.

*९ )* जमिनीची सजिवता वाढते .

*१० )* पक्व वनस्पती आच्छादनाबरोबर तरूण वनस्पती आच्छादनाचे लवकर विघटन होते.

*११ )* जमिनीत संजिवकांची निर्मिती होते .

*१२ )* जमिनीत नविन घडण होते .

*१४ )* पिकांच्या वाढीला आवश्यक अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.

*१५ )* स्थिर कर्ब जमिनीत स्थिरावतो.

*१६ )* आंतरकाष्टांगजन्य विघटन.

*१७ )* मर प्रतिबंधकता पिकात प्राप्त होते.

*१८ )* सर्वच  रासायनिक क्रिया -प्रक्रियांचे नियंत्रण होते .

*१९ )* जमिनीत वेगाने ह्युमसची निर्मिती होते.

*२० )* कर्ब- नत्र गुणोत्तर कमीत कमी होते.

*२१ )* एकदल-द्विदल आंतरपिकांचे आच्छादन मायेचा पदर असतो .

*२२ )* जमिनीतील बंदिस्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात .

*२३ )* मातीची धूप थांबून पाणी जिरते.

*२४ )* आच्छादनाने देशी गांडूळे चमत्कार करतात.

*२५ )* जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

*२६ )* आंतरपिकांची मुळे कुजवून जमिनीस पहेलवान बनवण्याचे कार्य करते.

*२७ )* जमिनीत मुबलक सुर्यशक्ति साठविली जाते.

*२८ )* पिकाचा अन्न तयार करण्याचा वेग वाढतो.

*२९ )* पिकांत साखरेचे प्रमाण , उत्पादन वाढवते .

*३० )* पिक -प्रती- पिक उत्पादन वाढतच राहते.

*३१ )* बियाणांची  उगवण व वाढीसाठी आवश्यक उष्णतामान मिळवून देते .

*३२ )* उन्हाळ्यात व दुष्काळात फळझाडे व पिकांना जिवंत ठेवून जगवते.

*३३ )* जिवाणू संख्या वाढतच राहते प्रकर्षाने जाणवणाऱ्या रोगांना आळा बसतो.

*३४ )* जलधारणाशक्ती वाढते.

*३५ )* जमिनीचा सामू नियंत्रित होतो.

*३६ )* खारे पाणी सुसह्य होते.

*३७ )* फळझाडांना भरपूर आधारमुळे फुटतात.

*३८ )* जमिनीतील व हवेतील उष्णता ह्यांचे मधील परस्पर अदलाबदली रोखली जाते.

*३९ )* जमिनीला अतिनील किरणांपासून वाचविते.

*४० )* जमिनीत शक्ती संतुलन बनते.

*४१ )* जमिनीत जैवगतीशास्त्राला चालना मिळते.

*४२ )* वैश्विक किरणांना पकडून फळे व पिकांची प्रत सुधारते.

*४३ )* पिकांची व फळांची चव तर वाढतेच शिवाय टिकाऊपणा पण वाढतो .

*४४ )* हवेतील आर्द्रता वेळप्रसंगी मुळयांना व जिवाणूंना पुरवली जाते .

*४५ )* जमिन क्षारपड होण्यापासुन वाचते.

*४६ )* जमिनीवरिल वातावरण खेळते राहते.

*४७ )* जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक नियंत्रित होतो.
 
*४८ )* जमिनीचे शुद्धिकरण होऊन पिकांत प्रतिकारशक्ति निर्माण होते .

 *४९ )* जमिनीत गुरुत्वाकर्षण व केशाकर्षण शक्तींचे संतुलन साधले जाते . 
*५० )* सर्वात महत्वाचे म्हणजे जमीन पूर्वरत स्थितीत राहते.

*शेतकऱ्यांनी शेतीत सेंद्रिय आणि जैविक खतांचा वापर केला तरच शेतीची उत्पादकता वाढेल*

Comments